Search This Blog

Tuesday 23 July 2013

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, sanjay nikas

स्वप्रांची सुंदर पहाट श्रावणातली. मनाला नवी उर्मी देणारी आणि उमेद देणारी. नव्याचैतन्याने जगण्याचे बळ देणारी. शंकरमहादेवाचा खास महिना. आणि बाळगोपाळांचा दर सोमवारी अर्धा दिवस शाळेचा महिना. या खास पर्वावर माझ्या सर्व मित्रांना बालकवींची कविता वाचायला देत आहे. लिखाणात थोडीफार चूक होऊ शकते पण भावार्थ समजून घ्या. आपला मित्र- संजय निकस पाटील 


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

vidarbhadoot sanjay nikas

Friday 19 July 2013

sanjay nikas

sanjay nikas

vidarbhadoot 'महाबीजमुळे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन बिजोत्पादन दुप्पट vidarbhadoot


अकोला - वाशिम जिल्ह्यात यंदा सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) घेतलेल्या खास मेहनतीमुळे दुप्पट वाढ झाली आहे. १० हजारांपेक्षाही जास्त हेक्टरमध्ये यावर्षी बिजोत्पादन कार्यक्रम राबविल्या जात आहे. ही जिल्ह्यातील शेतक:यांसाठी मोठी उपलब्धी आहे. यात वाशिमचे जिल्हाधिकारी आर.जी.कुळकर्णी यांचे मोठे योगदान आहे.
वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून महाबीजच्या सहकार्याने सोयाबीनचा पेरा वाढताच आहे. यात  २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक क्षेत्रात यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कमी-अधिक प्रमाणात सोयाबीनचा पेरा होत असला तरी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यात अर्थात सध्याच्या वाशिम उपविभागात सोयाबीनचा पेरा जिल्हय़ातील एकूण पे:यांच्या ६० टक्केहून अधिक आहे. जिल्ह्यात उत्पादित होणा:या सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती ८७ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे बीजोत्पादन झाले होते. राज्यात सेयाबीनच्या बियाण्याचे पासिंग करण्यासाठी किमान उगवणशक्ती ७० टक्के एवढी आवश्यक धरली जाते. ही बाब लक्षात आल्याने जिल्हाधिकारी आर.जी.कुळकर्णी यांनी वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांच्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे बीजोत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार अमानकर यांनी जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनात मे महिन्यात महाबीजचे अधिकारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, जिल्ह्यातील अनेक शेतकरी, तालुका कृषी अधिका:यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत महाबीजसह इतरही उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादनवाढीसाठी सोयाबीन बियाणे निर्मितीचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. शेतक:यांना सोयाबीन बियाणे उत्पादन करण्यासाठी प्लॅाट घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात महाबीजने कास्तकारांना योग्य मार्गदर्शन करीत सोयाबीन बिजोत्पादनासाठी नियोजनबद्ध सोयी उपलब्द करून दिल्या. आणि त्याचाच फायदा होत आज जिल्ह्यात सर्वाधिक बिजोत्पादन महाबीजच्या सहकार्याने शेतकरी घेत आहेत. यामुळे दहा हजार हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रात सोयाबीन बियाण्याची लागवड केली असल्याने या क्षेत्रातून दीड ते दोन  लाख क्विंटल बियाण्यांचे उत्पादन होणार आहे. पुढील वर्षी सोयाबीन बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात २० हजारापेक्षा जास्त हेक्टरएवढी वाढ करण्याचा मानस जिल्हाधिकारी कुळकर्णीयांनी व्यक्त केला आहे. vidarbhadoot 9405665599

शिकवणीवर्ग घेणा:या शिक्षकांविरुद्ध त्वरीत कारवाई करा vidarbhadoot


मेहकर : शहरातील शासनमान्य शाळेतील शिक्षक अवैध शिकवणीवर्ग व अतिरिक्त तासिका घेत असून, असे शिकवणीवर्ग घेणा:या शिक्षकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनने गटशिक्षणाधिकारी मेहकर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मेहकर शहरातील शासनमान्य शाळेवरील शिक्षक आपल्या विभागाची बंदी असताना राजरोसपणे शिकवणी वर्ग घेत आहेत. तसेच काही शाळाही अतिरिक्त तासिकेच्या नावावर विद्याथ्र्यांची फसवणूक करीत आहे. अतिरिक्त तासिका घेण्यासाठी संबंधीत शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असतांना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अतिरिक्त तासिकेच्या नावावर अवैध शिकवणी वर्ग सुरु आहेत. शाळेत कार्यरत असतांना शिक्षक, प्राध्यापक मंडळी शहराच्या विविध भागात अवैध शिकवणी वर्ग घेत आहेत. या माध्यमातून अनेक शिक्षक विद्याथ्र्यांची अडवणूक करून करीत असतात. vidarbhadoot

vidarbhadoot

vidarbhadoot

vidarbhadoot

vidarbhadoot

vidarbhadoot अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीचा सावळा विठ्ठल

vidarbhadoot
शेतीत राब-राब राबणार इथला शेतकरी-वारकरी  जेवढ्या निष्ठेने शेती करीत असतो, अगदी त्याच निष्ठेने आषाडी एकादशी आली म्हणजे त्याचे पाय पंढरीची वाट चालायला लागतात. सावळ्या विठ्ठलाचे ते सुंदर रुपडे मनाच्या गाभा:यात साठवून घेण्याची ओढ असते. तिथे कोणतेही मागणे नसते, की कोणताही स्वार्थ नसतो. अवघ्या वारकरी सांप्रदायाच्या दैवताला भेटण्याची फक्त ओढ असते. आणि अशाच प्रकारे अवघा महाराष्ट्र पंढरीत एकवटत असतो. आणि सावळा विठ्ठलही आपल्या भक्तांसाठी तेथे हतर असतो. केवळ एका भक्तामुळे विठ्ठल पंढरीत स्थिरावला आहे. भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने जनूकाही आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप:यात आहे. आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. जवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमानÓ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. असा हा विठ्ठलाचा तेथील देखणा साज आहे. आणि संपूर्ण वारकरी सांप्रदायाचा याच विठ्ठलाला भेटण्याचा आटापीटा राहतो. चला तर मग आपणही जाऊया सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला!!!  sanjay nikas 9405665599

vidarbhadoot

vidarbhadoot

Monday 15 July 2013

राज्यात 611 नवीन गोदामे बांधणार - अनिल देशमुख

राज्यात 611 नवीन गोदामे बांधणार - अनिल देशमुख

अकोला :  नवीन गोदाम बांधण्याच्या योजनेनुसार 5 लाख 95 हजार मेट्रीक टन क्षमतेचे 584  गोदाम बांधण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून या योजनेसाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना नाबार्डच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या भारतीय अन्न महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळातर्फे 3 लक्ष मेट्रीक टन क्षमतेचे 27 गोदाम बांधण्यात येणार आहेत. राज्यभरात काही नवीन गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी काम प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
केंद्र शासनाच्या वटहुकूमानूसार अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रती माणसी 5 ‍किलो प्रमाणे प्रत्येकाला धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तांदूळ 3 रुपये प्रतीकिलो, गहू 2 रुपये प्रतीकिलो व इतर भरडधान्य 1 रुपया प्रतिकिलो प्रमाणे शासनातर्फे पुरविण्यात येणार आहे. राज्यातील 6 कोटी 75 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या योजनेत कुटूंब प्रमुख म्हणून त्या कुटूंबातील महिला राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती राहणार असून या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही समिती नियंत्रण ठेवणार आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला या कायद्याचा उपयोग होणार आहे. लवकरच या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे.

तंटामुक्त गाव मोहिम; संपन्न जीवनाकडे वाटचाल

तंटामुक्त गाव मोहिम; संपन्न जीवनाकडे वाटचाल

महात्मा गांधींनी भगवत गीतेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दांच्या शक्तीवर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 'शांततेतून समृद्धीकडेÓ नेण्याचा मंत्र असणारी योजना म्हणजेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिस्तबद्ध न्याय-निवाडा आणि रामराज्य आणण्यासाठी आधुनिकीकरण, जागतिकीकरण, विभक्त कुटुंब पद्धत कधीच आडवी येणार नाहीत. फक्त सकारात्मक विचार हवा. महात्मा गांधीजींच्या शांततेतून समद्धीकडे या मंत्रावर, शासनाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम आज जागतीक पातळीवर पोहोचली आहे. यात योजनेच्या अंमलबजावणीवर सामाजिक सलोख्यासाठी, शांततेसाठी राज्याबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. राष्ट्रसंतांचा संदेश आहे की,
गावागावासी जागवा। भेदाभेद हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।
या संदेशाची आज आठवण करून यातील अर्थ आपण आपल्या जीवनात आणायला हवा आहे.
     दि. १५ ऑगस्ट, २००७  पासून सुरु झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा आलेख आता चांगलाच उंचावला आहे.  व्यापक लोकसहभागावर अवलंबून असलेल्या या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये शासकीय यंत्रणेचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ही मोहीम लोकांची, गावाची, स्वत:ची मोहीम आहे. जनतेशी सुसंवाद साधून सामाजिक शांतीच्या दिशेने त्यांची वाटचाल रहावी. याकरिता सहयोग आणि प्रेरकाची भूमिका शासन बजावित आहे. मोहिमेचा लेखाजोखा पाहिला तर तिला लाभलेल्या व्यापक प्रतिसादाची कल्पना येते.
तंटामुक्त गाव अभियान आज आपल्या ध्येंयापर्यंत पोहोचताना दिसत आहे. वेगवेगळे पुरस्कार राज्यातील सर्वच गावांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. ही मोठी उपलब्दी आहे. तंटामुक्त गाव प्रगतीची नवी वाट आज ठरत आहे. शांतता, सुरक्षितता आणि एकतेचे प्रतिक म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान याचा ख:या अर्थाने आज जनतेला प्रत्यय येताना दिसत आहे. ज्या गावांमध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदते त्या गावातील नागरिकांची आणि गावाची मोठी प्रगती होते हे जवळपास आता सर्वांनाच पटताना दिसत आहे. प्रत्येक  गावा-गावात स्थापन झालेल्या तंटामुक्ती समितींमुळे पोलिसांवर येणारा ताण कमी होत आहे. गावातही शांतता आणि सलोख्याचे वातावरण तयार होत आहे. समाजात स्वार्थी वृत्ती वाढू लागल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत.  भांडणाच्या प्रक्रियेत माघारीची भूमिका होत नाही यामुळे गटागटात भांडणे होतात. मात्र तंटामुक्ती सामितीमुळे हे वाद सोडविणे पोलिसांना सोपे होत आहे. या सर्व गोष्टी केवळ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे होत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम आता संपूर्ण समाजाला, देशाला संमृद्धीकडे घेऊन जात आहे.   संजय निकस