Search This Blog

Saturday 13 June 2020

घरी पाहुण्यांना बोलावले, तर बसेल दंड!

कोल्हापूर -कोरोना व्हायरसची भीती आता सर्वच लोकांमध्ये पसरली आहे. खेड्यापाड्यांमध्ये त्याबाबत जनजागृती झाली आहे. शहरात पोलिस आणि प्रशासन नागरिकांना सतर्क करत आहे. तर खेड्यांमध्ये ग्रामपंचायत आणि नागरीक मिळून उपाय योजना करत आहेत. कोल्हापूर जिलतल्या म्हसवे ग्रामपंचायतीने तर एक खास नोटीस काढून लोकांना सावध केले आहे. ग्रामदेवतेच्या पुजेसाठी कुणीही जमू नका किंवा पाहुण्यालाही बोलावू नका अशी नोटीस काढलीय. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ग्रामदेवतेची पूजा असल्याने ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून ही नोटीस काढली आहे. तर अशी आहे म्हसवे ग्रामपंचायतीची ही नोटीस पुढीलप्रमाणे आहे. सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, आपल्या म्हसवे गावाची मिरगी म्हाई करण्यात येणार आहे. म्हाई ही घरातल्या घरात करावी. कोणीही बाहेर गावातील पाहुणे बोलाऊ नये. कोणीही देवळात नैवेद्य दाखवायला जाऊ नये. सर्वांनी घरातुनच नैवेद्य दाखवावा. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नैवेद्य दाखवायला आल्यास ३00 रुपये, घरी एक पाव्हणा दिसल्यास ३00 रुपये, घरी दोन पाव्हणे दिसल्यास ६00 रुपये, दोनपेक्षा जास्त पाव्हणे दिसल्यास एक हजार रुपये असे दंड आकारण्यात येतील. याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. वरील कामाची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना स्वयंसेवक कमिटीतील ६0 स्वयंसेवक कार्यरत असतील. यापैकी अंबाबाई देवालयात पाचजण, मरगुबाई देवालयात पाच जण असतील. तर ५0 स्वयंसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिसपाटील, ग्रामसेवक, सरपंच , तलाठी व कोतवाल, हे गावात येणार्‍या पाहुण्यांच्याकडुन सक्तीने दंड वसूल करतील. कोरोना दक्षता समिती व ग्रामपंचायत म्हसवे यांच्यातर्फे ही नोटीस काढण्यात आली आहे.

दीड कोटीवर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणास मुकण्याची भीती

राज्यातील ग्रामीण भागात आधुनिक साधनांचा अभाव
ठाणे- कोरोना प्रादुभार्वाच्या लॉकडाऊन काळात शैक्षणिक वर्ष सरले आणि नवीन सुरूही झाले. मात्र शाळा नियमित उघडणे अवघड झाले आहे, अशा परिस्थितीत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय निवडला आहे. हा निर्णय स्तुत्य असल्याचे र्शमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी म्हटले आहे. मात्र या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन याचा अभाव असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील १ कोटी ६६ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याचा भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या आवश्यक बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पुरवून शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण या तत्त्वांचे पालन होऊ शकेल, असे पंडित यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनही दिले आहे. या २0२0-२१ या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासन ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे समजले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात व कोरोना संकटाशी लढण्यासाठी घेतलेला हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास पात्र आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्याचे मुख्य कारण ऑनलाईन शिक्षणप्रणाली हा तंत्रज्ञानाचा एक भाग असून नेटवर्क व इंटरनेटशी संबंधित आहे. तरी याबाबत महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील सद्यस्थिती अभ्यासणे आवश्यक ठरेल, असे पंडित यांनी शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे.
महाराष्ट्रात आजच्या घडीला १ लाख ६ हजार ३२७ प्राथमिक शाळा असून २७ हजार ४४६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून २ कोटी २४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांची संख्या ९९ हजार १४४ (७४.१६टक्के) इतकी मोठी आहे. तर विद्यार्थी संख्या किमान १ कोटी ६६ लाख (७४टक्के) इतकी आहे. या भागात विशेषत: दुर्गम आदिवासी क्षेत्रात आजही वीज पुरवठा सुरळीत होत नाही, हे वास्तव आहे. दुर्गम भागातील ४ हजार ९४९ शाळांमध्ये आजही वीज जोडणी झालेली नाही. त्यापैकी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या २७४ आहे. ही शासनाची आकडेवारी सांगते आहे.
राज्यातील एकूण शाळांपैकी ५१ हजार ६७७ (४८.६५टक्के) शाळांमध्ये संगणक व इंटरनेटची सुविधाच नाही. म्हणजेच या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञानही मिळालेले नाही. असे असताना शिक्षकांनी ते प्रशिक्षण विद्यार्थ्याला द्यावे, तर तो स्वत: प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्याचा देखील विचार होणे गरजेचे आहे, असेही पंडित आपल्या पत्रात म्हणतात. राज्यातील हजारो गाव-पाड्यात आजही मोबाईलचे नेटवर्क , इंटरनेटची सुविधा नाही. अशी गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन यासारखी आधुनिक साधने कुठून येणार, असा सवाल विवेक पंडित यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीचा दर अध्र्यावर

मुंबई- सरकारकडून कोरोना चाचणी निशुल्क दरात करण्यात येत असली तरी काही खासगी लॅबना कोरोना चाचणी करण्याची परवानगी सरकारने दिली होती, मात्र या चाचणीचे दर साधारणपणे ४ हजार ४00 रुपयांपयर्ंत होते, सर्वसामान्य रुग्णांना चाचणीचे दर परवडण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली होती, खासगी लॅब आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आता खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे जवळपास निम्म्याने कमी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
भारतात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आठ हजारापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून राज्यात आतापयर्ंत एक लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर तीन हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी स्वत: क ोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
यापूर्वी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ४00 रुपये घेण्यात येत होते. मात्र आता कोरोना चाचणीचे दर २ हजार २00 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. तर घरातून चाचणीचे नमुने घेऊन जाण्यासाठी २ हजार ८00 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या एकूण ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत प्रयोगशाळानिहाय तपासणी क्षमता, तपासणीचा भर या सर्व बाबींचा आढावा मुख्य सचिवांकडून घेण्यात आला होता. शासकीय प्रयोगशाळेत कोविड १९ ची तपासणी निशुल्क करण्यात येत आहे. पण खासगी प्रयोगशाळेत कोविड १९ तपासणीसाठी लोकांना ४ हजार ४00 रुपये मोजावे लागत होते.
राज्यातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत वाटाघाटी करुन कमीतकमी दर निश्‍चित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली होती.

उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी Vidarbhadooot

शिमला- कोरोना व्हायरसविरोधात आतापर्यंत ना कोणती लस ना कोणते औषध. इतर आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांचे ट्रायल कोरोनाविरोधात केले जात आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एचआयव्हीची औषध कोरोनावर उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र एचआयव्ही औषधांपेक्षाही कांगडा चहा कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा हिमाचल प्रदेशातील तज्ज्ञांनी केला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असे म्हटले. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त आयोजित वेबिनारदरम्यान संजय कुमार असे म्हणालेत. डॉ. संजय कुमार यांनी सांगितले, चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपाने सक्रिय ६५ रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचे परीक्षण केले. जे विशिष्ट व्हायरल प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात. मानवी पेशींत व्हायरसला प्रवेश करण्यात मदत करणार्‍या व्हायरल प्रोटिनला हे रसायन निष्क्रिय करू शकतात. चहा आधारित नैसर्गिक सुगंधित तेलयुक्त अल्कोहोल सॅनिटायझरचे उत्पादनही करत आहेत. तसेच चहाच्या अर्काचा वापर करून हर्बल साबणही तयार केले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या साबणात अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल गुण आहेत. हिमाचलातील दोन कंपन्यांमार्फत या साबणाचे उत्पादन आणि विपणन केले जात आहे. अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी १३0 पेक्षा जास्त औषधांचे परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात. सीएसआयआरचे राम विश्‍वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

    

कोरोनापासून संरक्षणासाठी आर्सेनिक अल्बम ३0 होमिओपॅथी औषध?

 मुंबई-कोरोनाव्हायरसविरोधात कोणती लस नाही किंवा कोणतं प्रभावी औषध नाही. वेगवेगळ्या औषधांचे ट्रायल कोरोनाविरोधात केले जात आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर अशा काही औषधांनंतर सध्या आर्सेनिक अल्बम ३0 या होमिओपॅथी औषधाची सर्वत्र चर्चा आहे. नेमकं हे औषध नेमकं काय आहे? आणि ते कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरू शकतं का? हे जाणून घेऊ यात.
आर्सेनिक अल्बम ३0 हे औषध घेण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानेच दिला आहे. सलग ३ दिवस रिकाम्या पोटी या औषधाचा एक डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका महिन्यानं पुन्हा असाच डोस घ्यावा असंही सांगण्यात आलं आहे.
आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंतर या औषधाकडे लोकांचा कल वाढू लागला. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीतही कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला या औषधांचं वाटप करण्यात आले, शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील या औषधाचे वाटप सुरू केले. मात्र हेच औषध सध्या सर्वत्र का दिले जाते आहे?
नवी मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टर तुषार बोरकर यांनी सांगितलं, होमिओपॅथीचं एक औषध बर्‍याच आजारांवर काम करू शकतं. सध्या आर्सेनिक अल्बम ३0 हे औषध चर्चेत आहे, कारण कोविड- १९ ची लक्षणं आहेत, त्या लक्षणांवर प्रभावी असणारे हे औषध आहे. ही लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण या औषधाला चांगली प्रतिक्रिया देत आहेत, असे दिसून आले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुष मंत्रालयानेही हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपयर्ंत सर्वजण हे औषध घेऊ शकता. फक्त प्रतिबंधात्मक म्हणूनच नव्हे तर उपचार म्हणूनही हे औषध वापरता येऊ शकते. Vidarbhadoot Buldhana