Search This Blog

Thursday 8 August 2013

महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाचा विकास अशक्य sanjay nikas


sanjay nikas पुणे : महिलांच्या सक्षमी करणाशिवाय देशाचा विकास होणार नाही. देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणातही यायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी केले.
इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाचे राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, श्रीमती राधा शंकरनारायणन्, जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपाल श्री. शंकरनारायणन् म्हणाले, क्वमहिलांचा शिक्षण, रोजगार व राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग यांच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्रामीण भागापर्यंत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहाची व्यवस्था होण्याची अतिशय आवश्यकता आहे.
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक मुलींना शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना आपले ध्येय साध्य करता येत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी. या परिस्थितीत बदल होण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेतच. पण त्याचबरोबर यासाठी लोकसहभाग आणि समाजातील विविध घटकांनीही योगदान द्यायलाच हवे, असे राज्यपाल श्री. शंकरनाराणन् म्हणाले.पुणे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी आहे, असे सांगून राज्यपाल श्री. शंकरनारायणन् म्हणाले, क्वआपल्या देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय समाजाचा तसेच देशाचा विकास होणे अशक्य आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांत 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पण मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.
यावेळी सहकारमंत्री पाटील व विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांचीही भाषणे झाली. संस्थेचे सचिव बाळासाहेब खटके यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

No comments:

Post a Comment